सोमवार, २ मे, २०१६

पूर्वतयारी -१

                                                   
गणेश
          २५ वर्षापूर्वी माझ्या ऑफीसमध्ये एक काशीचा जोतिषी आला होता तो भविष्य सांगत होता . सर्वांचे भविष्य सांगून झाल्यावर तो माझ्याकडे आला आणि म्हणाला " तुमचे भविष्य सांगू का ?" 
" नको सांगूस ! माझा विश्वास नाही भविष्यावर "
 "असू द्या साहेब ! ऐकून घ्यायला काय हरकत आहे का ? मी तुम्हाला खात्रीने सांगतो , तुम्हाला परदेश प्रवास घडणार आहे ."
"छे काहीतरीच काय सांगतो ? मी साधा कारकून माणूस आणि मी कशाचा परदेशी जातोय ? तू आपला मला खुश करण्यासाठी सांगत असशील तर ते मी समजू शकतो . "
नाही साहेब तुम्हाला माझ्या शब्दाची नंतर आठवण येईल . "
     मी आपले त्याचे ऐकून घेतले त्याला दहा रुपये दिले , जाऊद्या म्हटले लांबून आलेला माणूस आहेतो हि निघून गेला परत मला कधीही दिसला नाही . त्याचे भविष्य विसरूनही गेलो .
           मला तीन मुले आहेत त्यापैकी गणेश शिक्षणात जेमतेमच होता . पण स्वभावाने शांत आणि सेवाधारी . त्याचे कसे होईल अशी मला नेहमी चिंता असायची . एकदा आमचे घरी करवीरचे शंकराचार्य श्री विद्याशंकर भारती तीर्थ स्वामी महाराज आले होते . गणेशने त्यांची खूप सेवा केली आणि त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला " गणेश तुझे कल्याण होईल " मी म्हणालो स्वामी आता माझी चिंता मिटली . असो हा झाला श्रद्धेचा भाग प पू गुरुवर्य श्री चंपामाईचाहि आशीर्वाद होता . प्रयत्न आणि परिश्रम याची जोड जमली कि भाग्य बदलते . " भाग्याचेनी भडसे । उद्यामाचेनी मिसे । संपतीजात आपैसे । घर रिघे ।।" असे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात . तसे काहीसे गणेशचे झाले . दहावीनंतर dairy science and husbandryचा  कोर्स केला आणि जनवराचा डॉक्टर म्हणून मोटार सायकलला निळ्या झाकणाचा थर्मास लावून आमच्या गावाच्या आसपासची गावे फिरून शेतकऱ्यांची जनावरे तपासणे , त्यांना उपचार करणे. हा उपक्रम दोन तीन वर्षे केला                    
                  आमचे जेष्ठ चिरंजीव  योगेश हा पुण्याला होता तो फर्ग्युसन महाविद्यालात एम ए (इंग्रजी) होऊन  फोटोग्राफी करत होता .,  त्याने गणेशाला पण पुण्याला पाठवावे असा आग्रह धरला . आमचा थोडा विरोध होता पण त्याने ऐकले नाही …. गणेशाला त्याने पुण्याला नेले आणि लोणावळ्याच्या  रेसाकोर्समध्ये नोकरीला लावून दिले आणि तेथून पुढे गणेशाने भयंकर संघर्ष , कष्ट केले आणि त्याचे फलित म्हणून कि काय तो इंग्लंड ,, फ्रांस , स्विझर्लंड , मलेशिया आणि शेवटी ऑस्ट्रेलिया पर्यंत फेरीयर म्हणून करियर केले आणि आता तो ऑस्ट्रेलियाचा नागरिक झाला आहे .  क्रमश: …


ता क : ऑक्टोंबर २०१५ ते जानेवारी २०१६ पर्यंत मी ऑस्ट्रेलियात भरपूर प्रवास केला आणि त्या देशातील निसर्ग ,लोक, शासन, आधुनिक संशोधन , तेथील संस्कृती, तेथील भारतीय संस्कृती याचे सविस्तर वर्णन करून " देश वेष नोहे माझा " या बॉल्ग द्वारे आपल्यासाठी सदर करीन . आपले बहुमोल अभिप्रायाच्या प्रतिक्शेत.


२ टिप्पण्या:

  1. प्रत्युत्तरे
    1. जय हरी ! भोर साहेब तुमची मल ब्लॉग लिहितांनाच आठवण झाली होती तुमच्या प्रोत्साहनमुळे आनंद वाटतो व् आपले लिखाण कोणीतरी वाचतेय ही जाणीव फार सुखदायक असते. असो आपल्या अभिप्रयाबद्दल आभारी आहे।

      हटवा